रविवार, १५ मे, २०१६

मुनासिब चाचा.

संभाला कैद करायला दोन चार दिवसांत दिल्लीवरुन शाही पथक येइल तोपर्यंत संभावर लक्ष देणे गरजेचे होते . त्यामुळे दिलेरखान संभाजी राजांना कायम आपल्या नजरेसमोर ठेवत होता , दिलेरखानाच्या या वर्तवणूकीतला बदल संभाजी राजांना जाणऊ लागलेला. त्यावेळेस रायप्पा महार आणि ज्योत्याजी केसरकर यांनी गोसाव्याचा वेश घेउन दिलेरखानाच्या गोटात जाउन संभाजी राजांना दिलेरखानाच्या बेताबाबत पक्की माहिती दिली.

वेळ खूप कमी होता , लवकरात लवकर निसटून जाने गरजेचे होते.मोठी जोखिम घेउन शंभूराजे दिलेरखानाच्या तळावरुन गयाब झाले.या गडबडीत शंभूराजांचा कुटुंब कबिला तिथेच राहिला. आणि कैद झाला. इकडे खानाच्या तळावर शोककळा पसरली.

कर्तबगारी दाखवायला चांगली संधी आली आहे हे जाणून बालेखान नावाचा मूळचा विजापूरी सरदार दिलेरखानाच्या अदेशाची वाट न बघताच आपल्या तैनातीतले ५००० स्वार घेउन शंभूराजांना पकडण्यासाठी निघाला.शेवटी बर्याच पळापळीनंतर बालेखानाने शंभूराजांना गाठले.शंभूराजांबरोबर असलेल्या ५५ स्वारांपैकी निम्मे अधिक सोबती मारले गेले.शेवटी शत्रु सैन्याचा जोर आणि लोंढा इतका वाढला कि शंभूराजांना कैद झाली.शंभूराजे बालेखानाच्या तावडीत जिवंत सापडले.बालेखान आणि इतर सैनिकांनी शंभूराजांना दोरीने करकचून बांधून ठेवले.दोघांत बाचाबाची सुरु झाली.बालेखान शंभूराजांवर वार करणार तेवढ्यात पाठीमागून एक भाला आला आणि बालेखानाच्या पाठीत आरपार घुसला.

सगळे मुघल सैनिक बुचकाळ्यात पडले ; कारण बालेखानाला मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून बालेखानाचा सख्खा चुलता मुनासिब चाचा होता.मुनासिब चाचाने बालेखानाचा मृतदेह पोटाशी कवटाळला आणि ढसतसा रडू लागला.पण मुनासिब चाचाच्या चेहर्यावर केलेल्या कृत्याबद्दल आजिबात पच्छाताप दिसत नव्हता.

मुनासिब चाचाचे सर्व साथीदार गोंधळात पडले.चाचाने एका परक्या शत्रु पक्षातील काफरासाठी आपला वारस आणि प्राणप्रिय मुलाला का मारल असेल हे कोडे कोणालाच उमगत नव्हते.शेवटी एका सैनिकाने धाडस करुन रागाने चाचाला विचारले , " चाचा , आपण एका काफरासाठी आपल्याच मुलाला का मारलत..?? "

मुनासिब चाचाने उत्तर दिले , " एका बालेखानाला मारल्या मुळे तुम्ही एवढे दु:खी झालात..?? मग मला एका गोष्ठीच उत्तर द्या , जेव्हा हा बदमाश दिलेरखान अथनी आणि तिकोट्याला भर रस्त्यात आपल्या हिंदू आणि मुस्लिम आया बहिनींची इज्जत लुटीत होता तेव्हा तुमची मर्दुमकी आणि हमदर्दी कुठे गेली होती.तेव्हा याच हरामखोर दिलेरखानाला जाब विचारण्यासाठी एकच जवामर्द हातात तलवार घेउन धावला होता.अरे तुमच्याच इस्लामी आया बहिनींची इज्जत वाचवविन्यासाठी अन्यायाविरोधात तलवार उचलनारा कोण होता तो..?? तो होता , शेर सिवाचा छावा शंभूराजा."

चाचांच्या या वक्तव्यावर तर सगळेच खाजील झाले.गोंधळून सगळ्यांनी विचारल , " चाचा , आखिर आप कहना क्या चाहते हो..?? "

" बस इतनाही कहना चाहते है हम.अग औरंगजेब का दिलेरखान जैसा एक मामूली सरदार यहाँ आकर हम पर इतने जुलूम करता है ,हमारी मॅंा बहेन बेटियोंकी इज्जत लूटता है तो एक बात सोचो , अगर औरंगजेब खुद यहाँ दख्खन मे आएगा तो क्या होगा..?? "

" बिलकुल दुरुस्त , चाचा." समोरील काही स्वार शिपाई गडी बोलले.

" मै यह खुदा कि कसम खाकर कहता हूँ कि आलम दुनिया में हम दख्खनी मुसलमानों के लिए सबसे बडा काफिर कौन हे तो वह औरंगजेब है.बादशहाने मराठ्यांच्या राज्यांचा नाश केल्यावर हा औरंगजेब गोवळकोंडा आणि विजापूर या दोन्ही सल्नतनी नष्ट करणार.हम ये कैसे भूल गए कि गेल्याच वर्षी पडलेल्या दुष्काळात मराठ्यांचा राजा शिवाजी याने विजापूरकरांना एक हजार बैलांवरुन धान्य पाठवले होते.औरंगजेबाने नव्हे.यासाठी शिवाजी चे राज्य टिकले पाहिजे आणि त्याचा वारस संभा हा जगला पाहिजे.और इसके लिए मै एक क्या मेरे हजारों बालेखान जैसे बेटें की बली देने के लिए तैयार हूँ.."

आणि मुनासिब चाचाने कमरेची कट्यार काढली शंभूराजांचे दोर कापून काढले.राजांच्या पाठीवर प्रेमाने हात ठेउन म्हनाला , " जा बेटा संभू , त्या सिवावर मेहेरबानी करायला आम्ही तुला रिहा केला नाही.आम्हा दख्खनींची औरंगपासून हिफाजत करायला हा शेर सिवाचा छावा जिंदा राहिला पाहिजे... जा बेटे संभू , बेशक निकल जा."

ज्या शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे किल्ले प्रदेश बळकाउन एक प्रकारे बंडखोरीच केली.त्यांचे अफजल खान आणि इतर बरेच मातब्बार सरदार ढगात पाठविले आज त्याच विजापूरकरांनी शिवाजी च्या पोराला जीवदान का दिले..हाच प्रश्न सगळ्यांना पडला असेल.यालाच दूरदर्शी राजकारण म्हणतात.यामध्ये शिवाजी राजे तरबेज होते हे काही वेगळ सांगायला नकोच. औरंगजेबावर दबाव टाकण्यासाठी अलिकडे महाराजांनी दख्खनेत एक दबाव गट तयार करण्यात राजांनीच पुढाकार घेतला होता.त्यामुळे अदिलशाही आणि कुतुबशाही यांबरोबर मराठे सख्य राखून होते.
पुढी काळात शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेबाची दक्षिणेवर टोळधार पडल्यावर शंभूराजांनी अदिलशाही वाचवायचा खुप प्रयत्न केला हा याचाच एक भाग.
हा झाला एक राजकारणाचा भाग.तस पण मला राजकारण इतकस कळत नाहीं.
असो.......

एका बाजूला परधर्माचा मुस्लिम माणूस स्वतःच्या पोराला मारुन शंभूराजांना वाचवतो आणि दुसर्या बाजूला रक्ताच्या नात्यांच्या लोकांकडून शंभूराजांना पकडून दिल जात या गोष्ठी मनाला खुप खटकतात.

मियॅंाखान नावाच्या एका मुघल सरदाराने शंभूराजे दिलेरखानाच्या गोटातून पळन्यापुर्वी ज्योत्याजी केसरकर आणि रायप्पा महार यांकडे दिल्लीवरुन शंभूराजांना कैद करायला शाही पथक येत आहे याची योग्य वेळी माहिती दिली होती.मियॅंाखानने योग्य वेळी सावध केल्याने गडबडीत का होउना संभाजी महाराज दिलेरखानाच्या गोटातून पळाले.याचा उल्लेख वरती आला आहे.

पण याच गडबडीत संभाजी महाराजांचा कुटुंब कबिला मागे राहिला आणि अलगत दिलेरखानाच्या कैदेत सापडला.शंभूराजांच्या भगिनी राणू आक्का , पत्नी दुर्गाबाई व कमळजा यांना बहादुर गडावर कैदेत ठेवण्यात आले.तिथे याच मियॅंाखानने या राजपरिवाराची जमेल तेवढी सेवा केली.
पुढे फितुरुने कैद झाल्यावर याच मियॅंाखानने तुळापूरच्या तळावर आपली बदली करुन घेतली . कैदेत असताना संभाजी महाराजांना मियॅंाखानने आपुलकीने खुप मदत केली. याची कुणकुण औरंगजेबाला लागल्यामुळे मियॅंाखानचा जीव धोक्यात आला.. आणि बिच्चारा प्राणास मुकला . याबद्दल मी पुढे सविस्तर लिहिन.....

बाकि तुम्हाला धर्मवीर वगैरे संभाजी महाराज जयंती च्या एक दिवस उशीरा शुभेच्छा......蟽Ⴊ(Àč䁨ॐ̴

मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

किसना

प्रत्येक गावात अशी येडी गबाळी माणसं असतात . गावात हरिनाम सप्ताह , लग्न , गावजेवन , पूजा वगैरे काही कार्यक्रम असले कि हे लोक जेवन वाढने,पत्रावळ्या उचलने,भांडी घासने,खरकट झाडून काढणे अशी कामं अगदी मनापासून निस्वार्थीपणे करतात.

असच एक कॅरॅक्टर आहे आमच्या गावात.
किसना - वय वर्षे ५०+ , अंगात मळकट पांढरा टी शर्ट आणि गबाळा पायजामा , वाढलेली दाढी , पायात चार ठिकानी शिवलेली तुटकी चप्पल , शिक्षण अंगठेबहाद्दर.चेहर्यावर नेहमी स्माईल.😊

गेल्या रविवारी लग्न झाल माझ.त्यामुळे आठवडाभर गावातच होतो.पूजा झाली .गावच्या रिवाजाप्रमाणे गावजेवन ठेवलेल.रात्रि उशिरापर्यंत आख्ख गाव जेउन गेल.बरचस जेवन उरल.गावकीच्या मालकीच्या मोठमोठ्या भांड्यांचा ढीग लागलेला..किसनराव अजुन कुठे दिसले नव्हते.दुसर्या दिवशी सकाळी किसनराव घरी हजर.आईने त्याला उरलेल जेवन फेकून द्यायला सांगितल.आणि भांडी व्यवस्थित घासून ठेवायला सांगितली.या कामाचे किती पैसे द्यायचे किंवा घ्यायचे काहीच विषय झाला नाही.पण किसनरावांना मी लहान पणा पासून ओळखतो.अगदी एक वेळेसच्या जेवनाच्या मोबदल्यात हा माणूस दिवसभर काम करतो.कोणाला वाटल तर पाच दहा रुपये हातावर टेकवतात नाहीतर काहीच नाही.मी माझ्या आयुष्यात अजुनपर्यंत तरी एवढा निस्वार्थी माणूस पाहिलेला नाही..दुसर्या दिवशी दुपारी सहजच गावकीच्या धर्मशाळेत चक्कर मारली.गुपचूप आतमध्ये डोकावल. किसनरावांच काम अगदी मन लाउन सुरु होत.त्याला विचारल कि तु ही भांडी घासायच्या बदल्यात तुला माझ्या आईने किती पैसे द्यायच ठरवल आहे.तो म्हनाला देइल तेवढे घ्यायचे.मी वॅालेटमधून दोनशे रुपये काढले आणि त्याला दिले.आणि जाताना म्हनालो कि माझ्या आईला या पैशाबाबत काही बोलू नकोस.तिच्याकडून पण ती देइल तेवढे पैसे घे.अस म्हनुन त्याला बोलायलापण संधी न देता पानावलेल्या डोळ्यांनी झटकन बाहेर आलो.

गेली दहा वर्षे झाली मी गावात नसतो.एज्यूकेशन जॅाब मुळे इकड सिटीमध्येच असतो..एव्हना किसनाला मी विसरुनपण गेलेलो.
किती अजब असत ना जग आणि जगातली माणसं.तुम्ही काय न् मी काय.सगळे दहा दहा मिनिटात रंग बदलतात.पण दहा वर्षांपुर्वी मी गावात राहत असतानाचा किसना आणि आजचा किसना यात कसलाच काडीचाही बदल नाही झाला.

मी दहावीला असताना त्याची कित्योकदा टर उडवलेली मला आठवतय.त्याने कधीच कोणालाच साध्या एका शब्दानेपण प्रत्युत्तर दिलेल मला आठवत नाही.कोणी टिंगल केली टर उडवली कि फक्त मिश्किलपणे हसायचा.चेहर्यावर तेच हास्य.तोच निरागसपणा.आणि आपण स्वतःला शहाणे समझनारे त्याला येडा गबाळा ही पदवी बहाल करतो.

किसनाबाबत आठवडाभर खरच खुप अस्वस्थ वाटत होत.ऐकेकाळी त्याची टर उडवणारा मी.आज त्याच्या डोळ्यांत डोळे घालून नाही बोलू शकत.खुप अपराध्यासारख वाटतय.
गावासाठी बैलासारख काम करणारा माणूस.
मग स्वयंघोषित शहाण्या माणसांकडे हे गुण आहेत का..??
खरच सगळे लोक एखाद्याला इतक निष्ठूरपणे का वागवतात..??
आपण शहाणी माणसं ढेकून आहोत.
किती रक्त प्यायच एखाद्याच..??
कायतरी प्रमाण असत...

आपण त्याला स्वर्थासाठी कमी पैशात राबऊन घेउ शकतो पण दुसर्यांसाठी निस्वार्थीपणे राबन्यातच त्याच खर सुख-सामाधान लपलेल आहे.आपण कितीही ठरवल ना तरी त्याच्या त्या सुखात आपण कध्धीच वाटेकरी होउ शकत नाहीं.आपल्याला अस समाधानी जगण नाही जमनार पण आपण फक्त जळू शकतो अशा समाधानी जगन्यावर.

माझ्याकड आज छानस करियर असेल.सुखी वगैरे वैवाहिक जीवन असेल , प्रेमळ मित्र असतील , समाजात इज्जत प्रतिष्ठा स्टेटस वगैरे असेल. पण मी आज किसनासमोर हरलोय.
ही असली भोळी मानसं म्हणजे निरागसता भरलेल मंदिर असतात...यांना त्याचं जीवन सुखांव जगु द्यावे...हे शाहणे असूनही शाहन्या माणसांना कळत नाही.भन्नाट जगतो साला.. ह्यातच सगळं आलं.आयुष्याला मनमुराद मिठी मारून जगणाऱ्याला वेडं ठरवतं आपलं "शहाणं" जग!!

पण ज्याला गाव वेडा म्हणुन चिडवतं तोच मला सगळ्यात शहाणा मानुस वाटायला लागलाय.
पण ; अशा माणसांचा शेवट खुप वाइट होतो याचच राहून राहून वाईट वाटतय. 😞

बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

बोहोनी

वॅावSSSS , खरच किती pretty वाटत ना आपण कोणासाठीतरी Lucky Person असल्यावर.

हायवेवरच्या एका निरा आणि सरबताच्या टपरीवर एकदा सरबत पिलेला.१० रु झाले.मी १०० ची नोट दिली.त्याच्याकडे सुट्टे नव्हते.
माझ्यासमोर गल्ला रिकामा करुन केविलवान तोंड करुन मला तो सरबतवाला विनवन्या करु लागला. " साहेब,बघा ना सुट्ट हायती का..?? बोहनीचा टाइम हाय."
मी त्याच्याकडे पाहून फक्त स्माइल केल,आणि त्याला विचारल , " किती झाले..?? "
" धा रुपये." तो उत्तरला.
मी सहज टपरीमध्ये डोकावल,मी येण्याअगोदरच नुकतीच त्याने टपरी उघडलेली. अजुन त्याची आवराआवरीच चाललेली.मीच त्याचा पहिला कस्टमर होतो.
अजुन त्याची घालमेल चालू होती.
" थोडा येळ थांबता का शेठ.मी म्होरच्या दुकानातन सुट्ट घिउन येतू."

शेवटी मला त्याची आगतिकता पाहून कसतरीच झाल.माझ्याशी तो शक्य तेवढ्या अबदीने बोलायचा प्रयत्न करत होता..कारण स्पष्ट होत.सकाळ सकाळी गिर्हाइकाबरोबर किरकीर व्हायला नको,पहिलाच व्यावहार उधारीचा नको.त्यामुळे दिवसभर धंद्याला नाट लागू शकते.

" एक आयडिया आहे ना राव." मी एकदम Excited होउन त्याला बोललो.
"आजिबातच सुट्टे नसतील तर ही शंभराची नोट तुमच्याकडेच ठेव. मी तासाभरात परत येउन माझे उरलेले ९० रुपये परत घेउन जातो."

१० रुपयाच्या सरबतासाठी मी त्याच्याकडे एक तासाच्या खोट्या बोलीवर १००रुपये ठेवले.एक तासानंतर मला तिथ येण खरच शक्य नव्हत.कारण मला त्या दिवशी खुप कामं होती.पुन्हा कधी त्या रोडने येण जाण होइल ते सुद्धा शक्य नव्हत.आणि कधी त्या रोडने गोलोच तर त्या ९० रुपयांची आठवण येइल कि नाही याचीची मला गॅरॅन्टी नव्हती. आणि मी तिथे नंतर कधीतरी गेलो तर तोच माणूस टपरीमध्ये असेल कि नसेल..??
किंवा मीच विसरलो तर..?? हे सगळ मला माहित असूनपण मी मुर्खासारखे तिथे ९० रुपये कुठल्या भरवशावर आणि का ठेवले हे माझ मलाच कळाल नाही.
माझ्यात व्यवहारिकपणा खुप कमी आहे याची मला जाणीव झाली.आणि इथुन पुढेही मी जर असाच ढिला हात सोडून मुर्खासारख वागलो तर माझी कध्धीच प्रगति होणार नाही.असे माझ्या खास मित्रांनी मला बोललेले शब्द माझ्या डोक्यात घुमू लागले.

पण बाकि सरबत छान होता.कोल्हापुरात बागल चौकात एक सरबतवाला आहे.तिथे तीन वर्षांपुर्वी आम्ही सरबत पिलेला.त्याने एक वेगळाच फेव्हर शोधून काढलाय.लिंबू आणि कोकम मिक्स with सोडा..भारी लागतो.एकदा नक्की ट्राय करुन पहा..
मी तोच फेव्हर याच्याकडून घेतलेला.

असो....
काल दोन महिन्यांनंतर माझ त्या रोडने जाण झाल.का कुणास ठाउक पण सरबत प्यायची तीव्र इच्छा झालेली.त्याच टपरीसमोर थांबलो.टपरीतल्या माणसाने माझ्याकड पाहून मनमोकळेपणाने स्माइल केल.मी अॅार्डर द्यायला समोर जाणार तेवढ्यात माझा मोबाइल वाजला.बाजूला जाउन call receive केला.५-१० मिनिटे मोबाइल चालू होता.पुन्हा काउंटरजवळ गेलो.मला पाहून मी न सांगताच त्याने माझा आवडत्या फ्लेव्हरचा सरबत बनवलेला.त्याने अगदी आदरपूर्वक सरबताचा ग्लास पुढे केला.

त्याने मागच्या वेळेसचे १० रु आणि आत्ताचे १० रु या प्रमाणे मागील शंभराच्या नोटेमधले उरलेले ८० रुपये माझ्या हातावर ठेवत म्हनाला कि , " शेठ येत जावा कि असच अधन मधन बोहनीला."
मला जरा गोंधळल्यासारखच झाल.
" का रे..?? कशासाठी..?? " मी अच्छर्यचकित होउन विचारल.
" मागच्या टायमाला तुम्ही आलेला हिकड.त्यादिशी माह्या सगळा माल यक वाजूस्तवर संपला."
त्यादिवशी त्याच्या टपरीतली निरा एक वाजताच संपली.रोज पाच वाजता संपायची.सरबताची कस्टमर रोजच्यापेक्षा दुप्पट आले.त्याने पु्न्हा दुसर्या टपरीवरुन निरा मागउन घेतली.
एकंदरीत त्याला त्या दिवशी रोजच्यापेक्षा खुप फायदा झाला.

तिथुन निघताना मी खुप Happy होतो.
खर सांगू का..??
इतका आनंद मला जॅाब कन्फर्मेशनच्या वेळेस पण झाला नव्हता.
खरच खुप भारी and स्पेशल वाटत मला ज्यावेळेस माझ्यामुळे कोणीतरी happy असेल.

त्या उरलेल्या ९० रुपयांमुळे मला असा खुप मोठा आर्थिक फटका वगैरे बसला नसता.मी ते ९० रुपये विसरुनसुद्धा गेलो होते.
त्यादिवशीच्या उरलेल्या ९० रुपयांमुळे मी काय इतक मोठाही झालो नसतो.
पण फक्त ९० रुपयांतदेखील आपण दुसर्याला किती मोठ आनंद वाटू शकतो.याची मला प्रचिती आली.

सुख सुख आनंद आनंद आपण कशात शोधतो..??
इथे अगदी छोट्या छोट्या गोष्ठींमध्ये तसेच इतरांच्या सुखात-आनंदात देखिल खुप खुप सुख-आनंद दडलेल आहे..तो मिळवता आणि वाटता आला पाहिजे....बस्स इतकच..

शेवटी शंकर-जयकिशनच एक गाण आठवल.

किसी की मुस्कुराहटों पे हो निसार
किसीका दर्द मिल सके तो ले उधार
किसीके वास्ते हो तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम है
किसी की ...

(माना अपनी जेब से फ़कीर हैं
फिर भी यारों दिल के हम अमीर हैं ) \- (२)
मिटे जो प्यार के लिये वो ज़िन्दगी
जले बहार के लिये वो ज़िन्दगी
किसी को हो न हो हमें तो ऐतबार
जीना इसी का नाम है

(रिश्ता दिल से दिल के ऐतबार का
ज़िन्दा है हमीं से नाम प्यार का ) \- (२)
के मर के भी किसी को याद आयेंगे
किसी के आँसुओं में मुस्कुरायेंगे
कहेगा फूल हर कली से बार बार
जीना इसी का नाम है.

रविवार, ११ ऑक्टोबर, २०१५

विधि-लिखित.

इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सफर , डिपार्टमेंट चेंज या गोष्टी होतच राहतात.एखाद्या एम्प्लॅाइच डिपार्टमेंट चेंज झाल्यानंतर त्या एम्प्लॅाइला सगळ्या Formalities पुर्ण करुन नवीन डिपार्टमेंटला पाठवन खरच खुप डोकेदुखीच काम असत.काही जन समझदार असतात ते जातात.पण शक्यतो कोणी इतक्या सहज ऐकत नाही.मग कधी गोड गोड प्रेमाने बोलून,कधी धाक आणि कारवाईची भिती दाखऊन तर कधी जबरदस्ती करुन आणि प्रसंगी एम्प्लॅाइला मेंटली टॅार्चर करुन एम्पलॅाइजचे डिपार्टमेंट चेंज चे इश्शू H.R मोठ्या कुशलतेने हॅंडल करतात.

असच एका एम्पलॅाइची ट्रान्सफर अॅार्डर निघालेली. तो एम्पलॅाइ काही दुसर्या डिपार्टमेंटमध्ये जायल तयार होइना.बेस मॅनेजमेंट,मिडल मॅनेजमेंट यांनी खुप समझावल त्याला ; पण तो नाही ऐकला.

आता ही केस टॅाप मॅनेजमेंटकडे गेली.सिनियर H.R मॅनेजर ने एम्प्लॅाइला सगळी परिस्थिति सांगितली.
नेमका मीच का या एम्प्लॅाइच्या प्रश्नावर उत्तर देताना H.R ने तुच कसा योग्य आहेस,तुझ्यातले प्लसपॅाईंट,तुझी कॅपेबिलीटी,म्हनुन तुझच कस ट्रान्सफरसाठी सिलेक्शन केल,सध्या तुझी त्या डिपार्टमेंटला कशी निकडीची गरज आहे या गोष्ठी H.R ने एम्प्लॅाइला अगदी तिखट मीठ लाउन गोड गोड बोलुन हरभर्याच्या झाडावर चढवले...
तरीही एम्प्लॅाइ ऐकेना.

शेवटी ट्रान्सफर वगैरे या गोष्ठी विधि लिखित कशा असतात याबद्दल H.R एम्प्लॅाइला श्रीकृष्ण जशी अर्जुनाला गीता सांगत असेल तशाच तत्वज्ञानाच्या सांगण्याच्या तोर्यात एक महाभारतातल example देउन सांगू लागला.
      परिक्षित नावाचा राजा होता.तो एकदा जंगलात शिकार करायला जातो.एका झाडाखाली महाऋषि सिमीका तपच्छर्येसाठी ध्यान लाउन बसलेले असतात.परिक्षित राजा त्या ॠषिंना ओळखत नाही.परिक्षित राजाला त्या ॠषिंची मस्करी करायचा मूड होतो.परिक्षित राजा एक मेलेला साप महाऋषि सिमीकांच्या गळ्याभोवती गुंडाळून ठेवतो.आणि तिथून निघून जातो.थोड्या वेळानंतर महाऋषि सिमीकांचा पुत्र श्रृंगी तिथे येतो.वडिलांची झालेली विटंबना त्याला सहन होत नाही.आणि तो शाप देतो कि ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या महाऋषि सिमीकांच्या गळ्यात मेलेला साप गुंडाळला असेल त्याचा सात दिवसांत सापांचा राजा तक्षक चावल्यामुळे मृत्यु होइल.

या शापाबद्दलची बातमी परिक्षित राजाकडे पोहचते.राजा खुप घाबरतो.पण राजपंडित राजाची समजूत घालतात कि सगळे ॠषि काही खरे नसतात.राजा तु निवांत रहा.आपण यज्ञ-याग होम-हवन व मंत्रपठण करुन तुझा मृत्यु टाळू शकतो.राजा स्वतःला एका बंद रुममध्ये कोंडून घेतो.रुमला दरवाजे खिडक्या अशा बसवतो कि त्यातुन साप काय मुंगी सुद्धा आतमध्ये येउ शकत नाहीं.आणि आपल्या बाजूला सशस्त्र सैनिकांचा रात्ऱदिवस सतत जागता पहारा ठेवतो.अशाप्रकारे सहा दिवस पुर्ण होतात.यज्ञ-याग होम-हवन व मंत्रपठण यातुन परिक्षित राजाच्या मनातले मृत्युबद्दलचे भय एव्हाना नाहिसे झालेले असते.आणि सातव्या दिवशी परिक्षित राजाला बोरं खायची इच्छा होते.सेवक रुममध्ये बोरांची टोपली घेउन येतात.बोर खात असताना एका बोरमध्ये राजाला एक छोटीशी आळी दिसते..ती आळी बोरामधून बाहेर पडते.थोड्या वेळात त्या आळीचा आकार हळूहळू वाढत जातो.आणि त्याचा तक्षक नाग बनतो.तक्षक नाग छोट्या आळीच रुप घेउन बोरातुन राजाच्या रुममध्ये आलेला असतो..नंतर त्या आळीपासुनच तयार झालेला तक्षक नाग परिक्षित राजाला चावतो.यातच परिक्षित राजाचा मृत्यु होतो.आणि मनातील मृत्युचे भय नाहिसे झाल्यामुळे नरिक्षात राजाला मोक्ष मिळतो.

परिक्षित राजाची गोष्ट संपल्यानंतर H.R पुन्हा मुळ मुद्द्यावर येतात.
हे बघ मित्रा...( श्रीकृष्ण स्टाइल )
हे ट्रान्सफर वगैरे सगळ्या गोष्ठी विधि लिखित असतात रे..
आपण सगळे माध्यम आहोत.तो वर बसलाय ना तोच कर्ता करवता आहे.
माझच बघ ना. मी अगोदर अमुक तमुक शहरात अमुत तमुक ठिकानी होतो.आता इथ आलोय.
तु कितीही अडवण्याचा प्रयत्न कर.पण या घडणार्या गोष्ठी घडतातच.
एवढा मोठा कुरुसम्राट परिक्षित राजा आणि देव सुद्धा यातुन सुटले नाहींत तर तुम्ही आम्ही अतिसामान्य माणसं कोण..??
वगैरे.....वगैरे.....वगैरे.....

एवढी मोठी पुराण कथा आणि त्यातील परिक्षित,तक्षक,सिमिका ॠषि,श्रृंगी,विधि-लिखित,मोक्ष वगैरे सारखे अवजड शब्द ऐकून आता खरोखरच एम्प्लॅाइच डोक जड झालेल असत.त्याचबरोबर आपल्या विरोधालासुद्धा काहिच किंमत उरलेली नसून आता इथे आपली डाळ काही शिजनार नाही याचीही जाणीव एम्प्लॅाइला झालेली असते..एव्हाना एम्प्लॅाइ H.R कडे स्वतःहून ट्रान्सफर लेटर मागतो त्यावर मुकाट्याने सही करुन नवीन डिपार्टमेंटमध्ये जाण्याची मानसिक तयारी सुरु करतो.

अशा वेळेस बेस मॅनेजमेंट,मिडल मॅनेजमेंट आणि टॅाप मॅनेजमेंट पुर्ण ट्रॅप लाऊन एकमेकांशी कनेक्ट राहुन मिळून शिकार करतात.H.R चे लोक एम्प्लॅाइला कन्व्हेन्स करताना काय काय सुपरलॅाजिक अकलेचे तारे तोडतील याचा काही नेम नसतो.कदाचित हे पुढील काळात एम्प्लॅाइसाठी मोक्ष वगैरे सारख्या फॅसॅलिटीज् सुद्धा शोधून काढतील.

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

बेसिक कॅामनसेन्स & वेल एज्यूकेशन.

काहींना खुप अॅटिट्यूड असतो.माझ कधीतरी वर्षातून दोन तीनदा सिटी-बसने जाण येण होत.बसमध्ये असे काही महाभाग भेटतात ना कि डोक सुन्न होत.

एकदा हिंजवडी फेज-3 मधून घरी येत होतो.बस खचाखच फुल भरलेली आणि बरचशे लोक्स् उभे राहिलेले.माझ्याशेजारी एक आय.टी मधली मुलगी बसलेली.

आपण तिला सन्मानाने "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल" म्हणूयात..

तिने स्काय ब्ल्यू कलरची जीन्स,पिंक कलरचा टी-शर्ट घातलेला.आणि कानात त्या पिंक टी-शर्टला मॅच होणारे झुमके पेंडंन्ट घातलेल,ब्युटी-पार्लरमध्ये जाऊन तीन चार हजार रुपये खर्च करुन तिने स्ट्रेचिंग केलेले केस मोकळेच सोडलेले.वार्याबरोबर तिचे केस माझ्या चेहर्यावर उडत होते.चेहर्यावर आणि पापनीच्या इथे कॅास्मेटिकचा थर दिसत होता. डोळ्यांवर तिच्या पर्सनॅलिटीला साजेसा असा नाजुक चष्मा होता. हातात अॅपल-आयफोन आणि कानात हेडफोन्स घातलेले..बसमध्ये इतक्या गर्दीत होणार्या घामाच्या वासमारीपासून तिने मारलेल्या परफ्यूममुळे माझ प्रोटोक्शन होत होत.

आम्ही दोघे उजव्या बाजूच्या जेन्ट्स् रोमध्ये बसलेलो.बसमध्ये खुप सारे जेन्ट्स् उभे होते.पण तिला कुणीच सीटवरुन उठवल नाही..बर्याचदा लेडिज सीटवर कोणी जेन्ट्स् बसल तर काही जणी खुन्नस देउन खुप अॅटिट्यूड दाखवतात..आणि अपमान करतात.
बसच्या पुढच्या दरवाजातून एक प्रेगनंट मुलगी आत आली.i think सातवा महिना असेल तिला..पाच दहा मिनीट ती उभीच राहिली.पण कुठेच सीट रिकामी झाली नाही.

तिने या "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल" कडे एक आशाळभूत आणि अपेक्षित नजरेने पाहिल..पण या "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल" ने तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारख केल.समोर एक गरोदर मुलगी केव्हापासूनची उभी आहे. तिला आपण बसायला जागा द्यावी अस मला मनोमन वाटल. शेवटी मीच माझ्या सीट वरुन उठलो आणि त्या प्रेगनंट मुलीला बसायला जागा दिली.

अस म्हणतात कि एक स्त्रीच दुसर्या स्त्रीला समझून घेऊ शकते.किंवा स्त्रियांना एकमेकांच्या भावनांची कदर असते..मग या साध्या साध्या बेसिक कॅामनसेन्सच्या आणि माणूसकीच्या गोष्ठी या "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल"ला का महत्त्वाच्या वाटत नसतील..??
मग या "सो कॅाल्ड वेल एज्यूकेटेड गर्ल" ने इतक "शिक्षण" घेऊन नक्की काय शिकल..??
हिच्यापेक्षा गावाकडच्या अशिक्षित अडानी अनपड पोरी लाखपट भारी.

रिअल हिरो

शाळा सुटतानाची वेळ.

बाहेर गेटसमोर चकचकीक कपडे घातलेले पालक उभे,प्रत्येक जण महागड्या कार घेऊन आलेला,काही बायका पण कारमध्येच with driver,किंवा कमीतकमी Activa तर असतेच असते..एकंदरीत सगळ्या पालकांची पर्सनॅलिटी एकदम "रिच".

प्रत्येक जन आपापल्या मुलाला-मुलीला घेऊन पार्किंगच्या दिशेने चालत असतो..एकाच वेळेस सगळ्या कार बाइक्स् बाहेर पडल्यामुळे सगळ ट्राफिक जॅम होत.

त्या ट्राफिकमधून मळक्या कपड्यातला एक माणूस.चेहर्यावर दाढीचे खुंट वाढलेले,पायात तुटकी चप्पल घातलेली,आपल्या मुलीला सायकलच्या नळीवरच्या छोट्याशा सीटवर बसऊन इतक्या ट्राफिकमधून वाट काढत जात असतो.

पण खर सांगू का..??

मला तर तोच माणूस " रिअल हिरो " वाटतो.

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०१५

जीवनाबरोबरची लढाई.

मी एकदा ट्रॅक्टर ट्राय केलेला.मागे ट्रॅालीपण होती.ट्रॅक्टरच्या स्टिअरींग व्हीलपाशी हाताजवळच अजुन एक एक्सिलेटर असतो..इंजिनच RPM वाढवण्यासाठी.हव तेवढ सेट करायच.इंजिन बंद नाहीं पडत...

अस काहीस कार ला पण हव होत.एखाद्या मोठ्ठ्या चढणावर थांबाव लागल तर पुन्हा कार फर्स्ट गिअरवर पुढे घ्यायला खुपच कष्ट पडतात ना.
 .....आणि अशावेळेस पेट्रोल कार असेल तर मग वाटच लागली.अगोदर माझ्याकडून हमखास गाडी बंद पडायची.आणि मागे मागे यायची.
मला बिच्चार्या हॅंडब्रेकचा पण म्हणाव असा उपयोग करुन घेता येत नव्हता.एक पाय ब्रेकवर ठेउन मग क्लच अर्धवट सोडून लगेचच ब्रेकवरचा पाय चपळाइने काढून अॅक्सीलेटर देउन गाडी पुढे घ्यायला सुरवातीला मला जमतच नव्हत..पॅरलल पार्किंग शिकायला मला सहा महिने लागले..एक दोन वेळा गाड़ी डिव्हायडरला घासली..कार रिव्हर्स घेताना,पार्किंगमधून बाहेर काढताना,पार्किंग करताना कितीवेळा फ्रंट-रिअर बंपरची वाट लागली असेल हे फक्त मलाच माहितये..याबद्दल मी शक्ततो माझी गुस्ताखी कधीच कबूल करत नाही.

सांगायच ताप्तर्य हे कि एवढीशी छोटीशी कार चालवायला कित्ती डोक आऊट होत...मग jcb बुलडोझर , क्रेन , मोठ्ठे ट्रक्स् , ट्रेलर हे लोक कसे चालवत असतील..हा मला नेहमी प्रश्न पडतो..
i mean to say.. मला तर यांबद्दल जाम कुतूहल आहे.

पण खर खर सांगू का , जेव्हा पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न समोर येतो ना , तेव्हा काम करण शिकायला कुठलही प्रोफेशनल ट्रेनर, सेमिनार , Motivation training यांची गरज नाही पडत...जो तो प्रत्येक जण कामासाठी स्वतः डेव्हलप होत असतो.
आपल्या Corporate sector मधल्या professional language मध्ये बोलायच झाल तर तस स्वतःमध्ये स्वतःहून skill improvement करत असतो

कारण इथे लढाई बॅासबरोबर किंवा टारगेट बरोबरची नसते.इथे लढाई जगण्याबरोबरची असते.