मी शत्रुला फसवलय पण मित्राला फसवल्याच एकतरी उदाहरण दाखवा...{ छत्रपति शिवाजी महाराज }
फ्रेंडशिप डे च्या दिवशी मी ही post टाकलेली..त्याबद्दल थोडस खोल जाऊन अजुन लिहतोय.शिवाजी राजेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणात मित्रांचा वापर करुन मित्रांना धोका दिल्याच एकही उदाहरण आख्ख्या शिवचरित्रात शोधूनही सापडनार नाही.
शत्रुपक्षातदेखील शिवाजी राजांनी माणसं जोडली.आणि ही माणसं टिकवण्यासाठी राजेंनी दिलेले शब्द पाळून प्रसंगी जीव धोक्यात घालून कशी टिकवली...याचाच एक किस्सा.
मिर्झाराजे जयसिंग यांच्या शब्दाला मान देउन राजे औरंगजेब बादशाहाच्या भेटीसाठी आग्र्याला गेले.तिथे औरंगजेबाने राजेंवर चौकी पहारे बसउन त्यांना नजरकैदेत ठेवले.
सख्ख्या भावांना कैदेत टाकून त्यांची कत्तल करणारा,जन्मदात्या बापाला कैदेत टाकनार्या, धुर्त,कपटी औरंगजेबाच background पाहता तो शिवाजी राजेंबरोबर कपट करणार हे निच्छितच होत.त्यावेळी मिर्झाराजे जयसिंग बुर्हानपुरात होते.सहाजिकच शिवाजी महाराजांच्या जिवाची काळजी घेण्याची जबाबदारी मिर्झाराजेंचा मुलगा रामसिंग यांच्यावर पडली.रामसिंगानेही आपली माणसं मोगली फौजेबरोबर चौकी पहार्यांवर नेमली.
पण आजुबाजूला सतत रामसिंगाची माणसं असल्याने औरंगजेबाला सिवाचा काटा काढन अवघड वाटू लागल.बराच खल झाल्यानंतर कपटी औरंगजेबाने फौलादखानास फर्मावले सीवाला राजअंदाजखानच्या हवेलीत घेऊन जा.
राजअंदाजखानच्या हवेलीत महाराजांना नेणे म्हणजे मृत्यू कुठल्याही क्षणी येणारच.
या हुकुमाची माहिती रामसिंहास समजली तो तडक औरंगजेबाचा बक्षी मुहम्मद अमीनखान याच्या कडे गेला. त्यास रामसिंह सरळ म्हणाला बादशाहने शिवाजी महाराजांना मारण्याचा विचार केला आहे पण शिवाजी महाराज तर आमच्या शब्दाव विश्वास ठेवून एवढ्या लांब आले आहेत त्यामुळे बादशाहने प्रथम मला ठार मारावे,माझ्या मुलाला ठार मारावे मग सीवाला ठार मारावे. अमीनखान तसाच औरंगजेबाकडे गेला आणि झालेले बोलणे जसेच्या तसे कथन केले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ऐकून घेतल्यावर औरंगजेब अमीनखानास म्हणाला रामसिंहास सांग सीवासाठी तू जामीन राहा. जर तो पळाला, काही बिघाड केला तर तू जबाबदार राहशील, असे तू लिहून दे. अमीनखानाचा निरोप मिळताच रामसिंह म्हणाला, ठीक आहे, मी जामीन राहतो. शिवाजी महाराज असे काही करणार नाही. घडलेला सगळा प्रकार रामसिंह याने महाराजांना येऊन सांगितला. दुसर्या दिवशी महाराज रामसिंहच्या डे-यात गेले आणि मी काहीही बिघाड करणार नाही असे वचन दिले.
महाराज आता रामसिंहास दिलेल्या शब्दातून सुटका करून घेण्याचा विचार करत होते. त्यांनी रामसिंहास बोलावले आणि त्यास म्हणाले तुझ्या शब्दाला खूप वजन असे मला वाटत होते. पण इथे बादशाहास वारंवार विनंती करून देखील काही उपयोग नाही.
तू बादशाहाकडे जाऊन सरळ सांग ह्या सीवाला तुम्ही सांभाळा. त्याला मारायचे तेव्हा मारा आता माझी जबाबदारी संपली पण इथे उलटेच झाले रामसिंह महाराजांना म्हणाला मी तुम्हाला सोडून जाणार नाही.
महाराजांनी परत औरंगजेबाकडे अर्ज केला मला रामसिंहाच्या ताब्यात ठेवू नका. दुसरीकडे कुठेही हलवा यावर औरंगजेबाने उत्तर दिले रामसिंहासारखा निष्टावंत सेवक नाही म्हणून तिथेच राहावे. महाराजांना कसेही करून रामसिंहास दिलेल्या वचनातून मुक्त व्हायचे होते.
परत महाराजांनी रामसिंहास सांगितले बादशहास दिलेला जामीन अर्ज परत मागे घ्यावा. त्याला मला काय करायचे ते करु द्या. रामसिंहाने परत नकार दिला तो महाराजांना म्हणाला मिर्झा राजांना पत्र पाठवले आहे उत्तर येई पर्यंत थांबा.
18 August 1666 या दिवशी राजेंना विठ्ठलदास कोठडीमध्ये शिफ्ट करुन मारायचा प्लॅन होता.ही खबर राजांना एक दिवस अगोदर कळाली..
कपटी औरंगजेब काहीही करु शकत होता.पळून तर जायचय आणि रामसिंगाला दिलेला शब्दही पाळायचाय.अशा द्विधा मनस्थितीमध्ये राजे सापडले..रामसिंगांचा जामीन Active असताना राजेंनी पलायन केले असते तर रामसिंग तोंडावर पडले असते.
राजेंनी रामसिंगाबरोबर चर्चा करुन परिस्थिति समाझाऊन सांगून त्याला त्याचा जामीन अर्ज मागे घ्यायला सांगितला...औरंगजेबालाही हेच हव होत. औरंगजेबाने पुढे पहार्याची जबाबदारी पोलादखानावर सोपवली.
रामसिंगाने औरंगजेबास शिवाजी पळुन जाउ नये म्हनुन दिलेला जामीन अर्ज,माझ्याकडे असताना सिवा पळून जानार नाही याची घेतलेली जबाबदारी,रामसिंगाने औरंगजेबास दिलेला शब्द तसेच राजेंनी रामसिंगास दिलेला शब्द. अगोदर या सगळ्यामधून बाहेर पडुन मगच राजे 17 August 1666 यादिवशी कैदेतुन शिफातीने बाहेर पडले..
मैत्री कशी जपावी , एखाद्याला शब्द द्यावा आणि दिलेला शब्द कसा पाळावा ते शिवाजी राजेंकडून शिकाव.
फ्रेंडशिप डे च्या दिवशी मी ही post टाकलेली..त्याबद्दल थोडस खोल जाऊन अजुन लिहतोय.शिवाजी राजेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणात मित्रांचा वापर करुन मित्रांना धोका दिल्याच एकही उदाहरण आख्ख्या शिवचरित्रात शोधूनही सापडनार नाही.
शत्रुपक्षातदेखील शिवाजी राजांनी माणसं जोडली.आणि ही माणसं टिकवण्यासाठी राजेंनी दिलेले शब्द पाळून प्रसंगी जीव धोक्यात घालून कशी टिकवली...याचाच एक किस्सा.
मिर्झाराजे जयसिंग यांच्या शब्दाला मान देउन राजे औरंगजेब बादशाहाच्या भेटीसाठी आग्र्याला गेले.तिथे औरंगजेबाने राजेंवर चौकी पहारे बसउन त्यांना नजरकैदेत ठेवले.
सख्ख्या भावांना कैदेत टाकून त्यांची कत्तल करणारा,जन्मदात्या बापाला कैदेत टाकनार्या, धुर्त,कपटी औरंगजेबाच background पाहता तो शिवाजी राजेंबरोबर कपट करणार हे निच्छितच होत.त्यावेळी मिर्झाराजे जयसिंग बुर्हानपुरात होते.सहाजिकच शिवाजी महाराजांच्या जिवाची काळजी घेण्याची जबाबदारी मिर्झाराजेंचा मुलगा रामसिंग यांच्यावर पडली.रामसिंगानेही आपली माणसं मोगली फौजेबरोबर चौकी पहार्यांवर नेमली.
पण आजुबाजूला सतत रामसिंगाची माणसं असल्याने औरंगजेबाला सिवाचा काटा काढन अवघड वाटू लागल.बराच खल झाल्यानंतर कपटी औरंगजेबाने फौलादखानास फर्मावले सीवाला राजअंदाजखानच्या हवेलीत घेऊन जा.
राजअंदाजखानच्या हवेलीत महाराजांना नेणे म्हणजे मृत्यू कुठल्याही क्षणी येणारच.
या हुकुमाची माहिती रामसिंहास समजली तो तडक औरंगजेबाचा बक्षी मुहम्मद अमीनखान याच्या कडे गेला. त्यास रामसिंह सरळ म्हणाला बादशाहने शिवाजी महाराजांना मारण्याचा विचार केला आहे पण शिवाजी महाराज तर आमच्या शब्दाव विश्वास ठेवून एवढ्या लांब आले आहेत त्यामुळे बादशाहने प्रथम मला ठार मारावे,माझ्या मुलाला ठार मारावे मग सीवाला ठार मारावे. अमीनखान तसाच औरंगजेबाकडे गेला आणि झालेले बोलणे जसेच्या तसे कथन केले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ऐकून घेतल्यावर औरंगजेब अमीनखानास म्हणाला रामसिंहास सांग सीवासाठी तू जामीन राहा. जर तो पळाला, काही बिघाड केला तर तू जबाबदार राहशील, असे तू लिहून दे. अमीनखानाचा निरोप मिळताच रामसिंह म्हणाला, ठीक आहे, मी जामीन राहतो. शिवाजी महाराज असे काही करणार नाही. घडलेला सगळा प्रकार रामसिंह याने महाराजांना येऊन सांगितला. दुसर्या दिवशी महाराज रामसिंहच्या डे-यात गेले आणि मी काहीही बिघाड करणार नाही असे वचन दिले.
महाराज आता रामसिंहास दिलेल्या शब्दातून सुटका करून घेण्याचा विचार करत होते. त्यांनी रामसिंहास बोलावले आणि त्यास म्हणाले तुझ्या शब्दाला खूप वजन असे मला वाटत होते. पण इथे बादशाहास वारंवार विनंती करून देखील काही उपयोग नाही.
तू बादशाहाकडे जाऊन सरळ सांग ह्या सीवाला तुम्ही सांभाळा. त्याला मारायचे तेव्हा मारा आता माझी जबाबदारी संपली पण इथे उलटेच झाले रामसिंह महाराजांना म्हणाला मी तुम्हाला सोडून जाणार नाही.
महाराजांनी परत औरंगजेबाकडे अर्ज केला मला रामसिंहाच्या ताब्यात ठेवू नका. दुसरीकडे कुठेही हलवा यावर औरंगजेबाने उत्तर दिले रामसिंहासारखा निष्टावंत सेवक नाही म्हणून तिथेच राहावे. महाराजांना कसेही करून रामसिंहास दिलेल्या वचनातून मुक्त व्हायचे होते.
परत महाराजांनी रामसिंहास सांगितले बादशहास दिलेला जामीन अर्ज परत मागे घ्यावा. त्याला मला काय करायचे ते करु द्या. रामसिंहाने परत नकार दिला तो महाराजांना म्हणाला मिर्झा राजांना पत्र पाठवले आहे उत्तर येई पर्यंत थांबा.
18 August 1666 या दिवशी राजेंना विठ्ठलदास कोठडीमध्ये शिफ्ट करुन मारायचा प्लॅन होता.ही खबर राजांना एक दिवस अगोदर कळाली..
कपटी औरंगजेब काहीही करु शकत होता.पळून तर जायचय आणि रामसिंगाला दिलेला शब्दही पाळायचाय.अशा द्विधा मनस्थितीमध्ये राजे सापडले..रामसिंगांचा जामीन Active असताना राजेंनी पलायन केले असते तर रामसिंग तोंडावर पडले असते.
राजेंनी रामसिंगाबरोबर चर्चा करुन परिस्थिति समाझाऊन सांगून त्याला त्याचा जामीन अर्ज मागे घ्यायला सांगितला...औरंगजेबालाही हेच हव होत. औरंगजेबाने पुढे पहार्याची जबाबदारी पोलादखानावर सोपवली.
रामसिंगाने औरंगजेबास शिवाजी पळुन जाउ नये म्हनुन दिलेला जामीन अर्ज,माझ्याकडे असताना सिवा पळून जानार नाही याची घेतलेली जबाबदारी,रामसिंगाने औरंगजेबास दिलेला शब्द तसेच राजेंनी रामसिंगास दिलेला शब्द. अगोदर या सगळ्यामधून बाहेर पडुन मगच राजे 17 August 1666 यादिवशी कैदेतुन शिफातीने बाहेर पडले..
मैत्री कशी जपावी , एखाद्याला शब्द द्यावा आणि दिलेला शब्द कसा पाळावा ते शिवाजी राजेंकडून शिकाव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा