रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

Risk & Initiative

शिवाजी महाराज आपल्याला काय शिकवतात...???

आजची आपली यंग जनरेशन आणि छत्रपति शिवाजीमहाराज यात फक्त एकच बॅान्डिंग आहे.
छत्रपति शिवाजीमहाराज हे शब्द कानावर ऐकू आले कि आपण जय म्हनून रिकामे होतो,,आणि इथेच सगळ संपत.. शिवाजीराजे देव नव्हते , ते आपल्यासारखेच मनुष्य होते.

प्रॅाब्लम नसतात कुणाला..??..सगळ्यांनाच प्रॅाब्लम असतात,,अगदी शिवाजी महाराजसुद्धा खुप मोठमोठ्या प्रॅाब्लममध्ये सापडले होते..

१) ( Risk )
ज्या अफजलखानाने विजापुरात शहाजीराजांना अटक करुन धिंड काढलेली, ज्या अफजलखानाने कस्तुरीरंगन नावाच्या एका राजाला असच मैत्रीच अमिष दाखऊन कपटाने मारल,,ही अफजलखानामागची पार्श्वभूमि जिजाऊंनाही माहित होती ,, तरीही जिजाऊंनी अशा धोकेबाज अफजलखानाच्या भेटीला शिवाजीराजांना पाठवल,,अष्टप्रधान मंडळ आणि। जुनी जाणती माणसं नको म्हणत असताना पोटच्या पोराला अफजलखान भेटीसाठी पाठवणारी जिजाऊ ....अशा मानसिकतेच्या किती माता आहेत महाराष्ट्रात..??

आजकालच्या जगात आपल्याला मरायला अफजलखानाच्या समोर जायचे नाहिये, सांगायच ताप्तर्य हे कि बर्याच ठिकाणी बिंधास्त रिस्क घेतल्याशिवाय काही पर्यायच नसतो..अशा ठिकाणी आपल्यातली किती मराठी पोर रिस्क घ्यायला तयार असतात..आपण आपल्या आयुष्यातले बरेचशे निर्णय दुसर्यावर ढकलून देतो किंवा बर्याचदा आपण घेतलेले निर्णय दुसर्या कोणाच्या सांगण्यामुळे बदलतो...

आजच्या या वेगाने पसरत असलेल्या कार्पोरेट क्षेत्रात , नोकरी , व्यवसाय , बिजनेसमध्ये बरचस यश हे केवळ रिस्क घेण्याच्या मानसिकतेवरच अवलंबून असत,त्यामुळे वाळवंटातून आलेले मारवाड़ी समाज आणि पाकिस्तानमधून हाकलकऊन लावलेला सिंधी समाज आज प्रगति करत आहे.
पण आपल्याला आपल्या आईवडिलांनीच कम्फर्ट झोनमध्ये जगायची घाणेरडी सवय लाऊन ठेवलेली आहे,,या सवयी आपल्याला बदलल्याच पाहिजे...

२) Initiative ( पुढाकार )
मोठ व्हायच,,??,,, नाव कमवायचय...???
एकट्याच्या कष्टावर कोणीच मोठा होऊ शकत नाहीं,..त्यासाठी लागतात माणसं , अरे पण माणसं आपल्याकडे येणार कशी नुसता पैसा फेकून कोणी येत नसत...आणि। आलच तर माणसं टिकवण हे काय सोप्प काम नव्हे, त्यासाठी आपण स्वतः प्रेरणेचा स्रोत असल पाहिजे, लोकांनी आपल्यापासुन प्रेरणा घेतली पाहिजे, इथे उंटावर बसून शेळ्या हाकलून काय फायदा होणार नसतो....स्वतः पुढाकार घेतल्याशिवाय काही काम होत नसतात.आपण स्वतः पुढाकार घेतला तरच आपल्या हाताखालची माणसं आपल्याला follow करतात.

आता थोड हे शिवाजीराजांच्या लाईफबरोबर मॅच करु....
अफजलखान दगाफटका करणारच हे राजे जाणून होते , पण तरीही ते स्वतः अफजलखानाला भेटायला गेले..
का गेले..??
राजे होते ते.
त्यांच्या एका आदेशावर कोणीतरी गेलच असत अफजलखानाला भेटायला..
मग राजांनी का अस केल..??...
का गेले ते अफजलखानाला स्वतः भेटायला...???

इथे राजांनी स्वतः पुढाकार घेतला त्यामुळेच तानाजी मालुसरे , बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशिदसारखी माणसं राजांसाठी मरायला तयार होती..

शिवचरित्र हा नुसत डोक्यावर घेऊन मिरवायचा विषय नसून डोक्यात घेण्यासारखा विषय आहे...
शिवचरित्र आपणाला काय शिकवते,,जरा आपल स्वतःच आयुष्य शिवाजीराजे , संभाजीराजे आणि जिजाऊमॅासाहेब यांच्याबरोबर मॅच, कंपेअर करुन पहा..
शिवचरित्रातुन अजुन शिकण्यासारख्या खुप गोष्ठी आहेत.. ...वेळ मिळेल तसा लिहीत राहिल..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा