गुरुवार, १४ मे, २०१५

जगण्यातील काही तत्व.

खुप दिवसांपासुन वाटलेल लिहाव याबद्दल,,अशाच काही माणसांकडुन जगण्याची काही तत्व शिकायची असतात.
काही माणसांची लायकीच ती असते, Officer Post मिरवताना लोकांच ( I talking about junior ) प्रेम कदाचित यांना पचत नसाव.यांना प्रेमाची आणि नम्रपणाची अॅलर्जी आहे का हेच मला कळत नाही .त्यांना कदाचित हे माहित नसाव कि प्रेम दिल्यानच प्रेम मिळत.एक माणूस म्हनुन जगताना Simply कस जगाव हे पण विसरुन जाव का...???

3 वर्षांपुर्वीची गोष्ठ , दोन उच्चपदस्थ अधिकार्यांचा कार अॅक्सेटंट झालेला,,कोणाचा,,कसा,कुठे जाताना झाला हे सध्या महत्त्वाच नाही,त्यांच्या कारने हायवेवर रस्ता सोडल्यामुळे 3-4 पलट्या खाल्ल्या,रस्त्याच्या बाहेर झुडपात कार गेल्यामुळे ते बचावले,,कार कदाचित डिव्हायडरला तोडुन पलिकडच्या Apposite लेनवरील गाड्यांवर आदळली असती तर कोणीच वाचल नसत...

नशीब वगैरे मी काही मानत नाही,पण सगळे म्हनतात कि ते दोघे नशीबाने वाचले , दोघांनाही मेजर डॅमेज झालेल,,,,,महिनाभर सुट्टीवर होते...
एवढा मेजर अॅक्सेटंट होउनही त्यांच्याबद्दल कोणालाच कसलीच काळजी वाटली नाही ..त्यांना हॅास्पिटलमध्ये बघायलासुद्धा कोण गेल नाही...प्रार्थना आणि दुवा करण लांबच राहिल . याउलट त्यावेळेस सगळे म्हणत होते कि, "गाडीने अजुन एक-दोन पलट्या मारल्या पाहिजे होत्या "

मला तेंव्हा अस म्हणणार्यांचा मनापासुन राग आलेला..च्याआयला,,कोणीतरी मृत्यूच्या दाढेतून परत आलय....अरे ते कसेही असुदेत,ती सुद्धा माणसेच आहेत,,आपण मदत करु नाही शकलो म्हनुन काय झाल,थोडीशी सहानुभूति तर दाखऊ शकतो ना ,,आपण समझतो इतकही कोणी वाइट नसत...Officer ने कडक आणि खड्डूस वागावच लागत,,ते एक रोल करतायेत,,,मीच स्वतःच्या मनाची समजूत घालत होतो..जग किती चांगल आहे,,सगळी माणस चांगलीच असतात,,वगैरे,वगैरे ,वगैरे....!

एखादा माणूस कितीही भेंचोद असुदेत, मृत्युच्या दाढेतुन वाचला असता माणसाचा सगळा माज जिरतो,,त्याचा जसा पुनर्जन्म होतो तशी त्या माणासाची विचारसरणीसुद्धा बदलते.....!!!!,,,अशी मरता मरता वाचलेली बरीचशी माणस पाहिलीयेत मी...हे लोक प्रत्येक क्षण आनंदाने जगतात..साहसा कोणालाच दुखावत नाहीत ..खुप प्रेमळ बनतात..
मला वाटलेल त्यांनी स्वत:मध्ये असाच काहीसा बदल घडवला असेल,,😊

पण आपल्याला तस कायतरी वाटून काय फायदा,,ज्याच त्याला कळाल पाहिजे,,,ते त्यांच आयुष्य आहे,त्यांच ते कसही जगतील...त्यांच अॅटीट्यूड त्यांच्यापाशी.
आता मध्यंतरी  त्यांच्याशी काही कामांमुळे पुसटसा अप्रत्यक्ष संपर्क आला,तीच गुर्मी,तोच माज,तीन वर्षांनंतरही त्यांचा माज पुर्वीपेक्षा दहापट वाढलाय,,काम असल कि Juniorबरोबर थोडसच गोड गोड बोलायच,,इतर वेळेस कुचक्यासारख only Bossing,Bossing,Bossing,तोंडावर सदानकदा बारा-तेरा वाजलेले,,जनु काही आख्ख्या जगाच टेंशन यांनाच आहे,दिलखुलासपणे हसण यांना कध्धीच माहित नाहीं.

मला आता कळाल कि ते लोक,, " गाडीने अजुन एक-दोन पलट्या मारल्या पाहिजे होत्या" अस का म्हनत होते ते..

पैसे, Image,मान-सन्मान, प्रतिष्ठा तर थोड्याबहुत प्रमाणात सगळ्यांकडेच असते , अगदी भिकार्यांनासुद्धा इज्जत असते.
ते दोघेजन आपल्यासाठी दुवा करणारे दोन माणसही जोडु नाही शकले...संकटकाळात इतरांकडुन सहजच मिळणारी थोडीशी सहानुभुतिसुद्धा नाही यांच्या नशिबात.
मला एक प्रश्न पडला,,मग या अधिकार्यांनी जीवनात नक्की काय कमावल...? ये जीना भी क्या जीना है ......बापरे.

मी तर एक धडा कायमचा शिकलो,,," आपल आयुष्य आपण मजेशीर जगायच, जगताना अस जगायच कि, कोणी आपल्यावर प्रेम नाही केल तरी चालेल,,पण कुणी आपला द्वेष तरी नाही केला पाहिजे."
                           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा