सोमवार, १८ मे, २०१५

राबनारे हात आणि यशस्वी माणूस.

तुम्ही कोणीही असोत...

राजकारणी,उद्योजक , बॅास , मॅनेजर , employee...किंवा अजून कोणितरी.

यशाच्या सर्वोच्च पातळीवर तुम्ही पोहचला असाल , आणि जर तुम्हाला टिकून राहायचे असेल तर ज्या शिडीने तुम्ही वर चढून आलात त्या शिडीला कध्धीच लाथ मारु नका ,कारण आकाशाची ऊंची गाठायच्या प्रयत्नात मातीचा आधार सोडायचा नसतो.

काहीच ठराविक माणसं मोठी होतात.
शून्यातुन विश्व निर्माण करतात.हे सगळ एकटा करु शकतो का...???

हे सगळ टीम वर्क असत.एखाद्याच्या यशामागे शेकडो राबते हात असतात.त्या राब राब राबणार्या माणसांनाही माहित असत कि,आपल्याला मिळणार्या यशामुळे मान-सन्मान मिळनार नाही ; पण त्या माणसांच्या मनात समाधान असत . कि एका चांगल्या कामात आपण सहभाग घेतलाय.कोणासाठीतरी आपण जीव ओतुन काबाडकष्ट करतोय .

माणसांना जगताना अजुन हव काय असत यार...???
मोबदल्यापेक्षा सामाजिक स्थैर्य ( social security ) महत्वाच....

मी अस म्हनत नाहिये कि मिळणार्या यशामध्ये तुम्ही राब राब राबनार्या लोकांना  भागीदार करुन घ्या . ते राबनारे लोकही तशी अपेक्षा ठेवत नाहीत . तुम्हाला सपोर्ट करण्यातच ते स्वतःला भाग्यवान समझतात.

पण तुमच सुद्धा एक कर्तव्य बनत.

फक्त याची जाणीव ठेवा कि कोणीतरी आपल्यासाठी खुप कष्ट केलेत . आपल असन किंवा नसन ते केवळ आपल्या हाताखालच्या लोकांमुळेच आहे.
जी माणसं आपल्यासाठी देह-भान,तहान-भूक विसरुन निस्वार्थीपणे मैलों मैल चाललीत त्या माणसांसाठी जास्त नाही फक्त एक मैल चालायची तयारी ठेवा.

काम करणार्या माणसांना इतर स्वरुपात कामाचा मोबदला मिळतोच मिळतो.
पण ज्या सर्वोच्च स्थानावरिल व्यक्तिकडुन कृतज्ञतापुर्वक आपल्या कामाची दखल घेतली जाते , प्रेमाने दोन शब्द बोलले जातात , ही कृतज्ञता आणि ते प्रेमाने बोललेले दोन शब्द लाखो रुपयांच्या पॅकेजपेक्षा श्रेष्ठ ठरतात.

मला नाहीं वाटत कि मिळालेल भलमोठ्ठ सक्सेस कोणी एकटा पचऊ शकेल.

आपण काय कमवल आणि काय गमावल याच मोजमाप आपण किती माणसं जोडली(टिकवली) तसेच आपल्याला किती माणसं सोडुन गेली यावर ठरवल जात....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा