मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

किसना

प्रत्येक गावात अशी येडी गबाळी माणसं असतात . गावात हरिनाम सप्ताह , लग्न , गावजेवन , पूजा वगैरे काही कार्यक्रम असले कि हे लोक जेवन वाढने,पत्रावळ्या उचलने,भांडी घासने,खरकट झाडून काढणे अशी कामं अगदी मनापासून निस्वार्थीपणे करतात.

असच एक कॅरॅक्टर आहे आमच्या गावात.
किसना - वय वर्षे ५०+ , अंगात मळकट पांढरा टी शर्ट आणि गबाळा पायजामा , वाढलेली दाढी , पायात चार ठिकानी शिवलेली तुटकी चप्पल , शिक्षण अंगठेबहाद्दर.चेहर्यावर नेहमी स्माईल.😊

गेल्या रविवारी लग्न झाल माझ.त्यामुळे आठवडाभर गावातच होतो.पूजा झाली .गावच्या रिवाजाप्रमाणे गावजेवन ठेवलेल.रात्रि उशिरापर्यंत आख्ख गाव जेउन गेल.बरचस जेवन उरल.गावकीच्या मालकीच्या मोठमोठ्या भांड्यांचा ढीग लागलेला..किसनराव अजुन कुठे दिसले नव्हते.दुसर्या दिवशी सकाळी किसनराव घरी हजर.आईने त्याला उरलेल जेवन फेकून द्यायला सांगितल.आणि भांडी व्यवस्थित घासून ठेवायला सांगितली.या कामाचे किती पैसे द्यायचे किंवा घ्यायचे काहीच विषय झाला नाही.पण किसनरावांना मी लहान पणा पासून ओळखतो.अगदी एक वेळेसच्या जेवनाच्या मोबदल्यात हा माणूस दिवसभर काम करतो.कोणाला वाटल तर पाच दहा रुपये हातावर टेकवतात नाहीतर काहीच नाही.मी माझ्या आयुष्यात अजुनपर्यंत तरी एवढा निस्वार्थी माणूस पाहिलेला नाही..दुसर्या दिवशी दुपारी सहजच गावकीच्या धर्मशाळेत चक्कर मारली.गुपचूप आतमध्ये डोकावल. किसनरावांच काम अगदी मन लाउन सुरु होत.त्याला विचारल कि तु ही भांडी घासायच्या बदल्यात तुला माझ्या आईने किती पैसे द्यायच ठरवल आहे.तो म्हनाला देइल तेवढे घ्यायचे.मी वॅालेटमधून दोनशे रुपये काढले आणि त्याला दिले.आणि जाताना म्हनालो कि माझ्या आईला या पैशाबाबत काही बोलू नकोस.तिच्याकडून पण ती देइल तेवढे पैसे घे.अस म्हनुन त्याला बोलायलापण संधी न देता पानावलेल्या डोळ्यांनी झटकन बाहेर आलो.

गेली दहा वर्षे झाली मी गावात नसतो.एज्यूकेशन जॅाब मुळे इकड सिटीमध्येच असतो..एव्हना किसनाला मी विसरुनपण गेलेलो.
किती अजब असत ना जग आणि जगातली माणसं.तुम्ही काय न् मी काय.सगळे दहा दहा मिनिटात रंग बदलतात.पण दहा वर्षांपुर्वी मी गावात राहत असतानाचा किसना आणि आजचा किसना यात कसलाच काडीचाही बदल नाही झाला.

मी दहावीला असताना त्याची कित्योकदा टर उडवलेली मला आठवतय.त्याने कधीच कोणालाच साध्या एका शब्दानेपण प्रत्युत्तर दिलेल मला आठवत नाही.कोणी टिंगल केली टर उडवली कि फक्त मिश्किलपणे हसायचा.चेहर्यावर तेच हास्य.तोच निरागसपणा.आणि आपण स्वतःला शहाणे समझनारे त्याला येडा गबाळा ही पदवी बहाल करतो.

किसनाबाबत आठवडाभर खरच खुप अस्वस्थ वाटत होत.ऐकेकाळी त्याची टर उडवणारा मी.आज त्याच्या डोळ्यांत डोळे घालून नाही बोलू शकत.खुप अपराध्यासारख वाटतय.
गावासाठी बैलासारख काम करणारा माणूस.
मग स्वयंघोषित शहाण्या माणसांकडे हे गुण आहेत का..??
खरच सगळे लोक एखाद्याला इतक निष्ठूरपणे का वागवतात..??
आपण शहाणी माणसं ढेकून आहोत.
किती रक्त प्यायच एखाद्याच..??
कायतरी प्रमाण असत...

आपण त्याला स्वर्थासाठी कमी पैशात राबऊन घेउ शकतो पण दुसर्यांसाठी निस्वार्थीपणे राबन्यातच त्याच खर सुख-सामाधान लपलेल आहे.आपण कितीही ठरवल ना तरी त्याच्या त्या सुखात आपण कध्धीच वाटेकरी होउ शकत नाहीं.आपल्याला अस समाधानी जगण नाही जमनार पण आपण फक्त जळू शकतो अशा समाधानी जगन्यावर.

माझ्याकड आज छानस करियर असेल.सुखी वगैरे वैवाहिक जीवन असेल , प्रेमळ मित्र असतील , समाजात इज्जत प्रतिष्ठा स्टेटस वगैरे असेल. पण मी आज किसनासमोर हरलोय.
ही असली भोळी मानसं म्हणजे निरागसता भरलेल मंदिर असतात...यांना त्याचं जीवन सुखांव जगु द्यावे...हे शाहणे असूनही शाहन्या माणसांना कळत नाही.भन्नाट जगतो साला.. ह्यातच सगळं आलं.आयुष्याला मनमुराद मिठी मारून जगणाऱ्याला वेडं ठरवतं आपलं "शहाणं" जग!!

पण ज्याला गाव वेडा म्हणुन चिडवतं तोच मला सगळ्यात शहाणा मानुस वाटायला लागलाय.
पण ; अशा माणसांचा शेवट खुप वाइट होतो याचच राहून राहून वाईट वाटतय. 😞