के.इ.एम हॅास्पिटल पुणे.
4-6 महिन्यांपुर्वी.माझ्या एका फ्रेंडचा भाचा म्हनजे दहा महिन्यांच बाळ आजारी होत.त्याच्या पोटात लिव्हरशेजारी कॅन्सरची गाठ होती.
केमो,रेडिएशन टेस्ट यातच साधारण आमचा एक-दीड महिना गेला होता.पुढे अॅापरेशनसाठी पुर्वतायारी आणि रिकव्हरीसाठी अजुन दोन आठवडे बाळाला हॅास्पिटलमध्येच ठेवाव लागणार होत.
अस साधारण तीन महिने कधी रोजच तर कधी दोन-तीन दिवसांआड आमच्या नियमितपणे हॅास्पिटलमध्ये चकरा होत असत.
तिथल्या पार्किंगशेजारी लागूनच एक टॅायलेट आहे.ते टॅायलेट मेंटेन करण्यासाठी हाऊसकिपींग करणारे आणि इतर बिलींगच वगैरे काम बघनारे एक असे दोन-तीन माणसं तिथं असतात.
बर्याचदा आम्ही त्यांना टॅायटेट-मुतारीच्या समोरच्याच एका कट्ट्यावर दुपारच जेवन करताना पाहिलेल..त्यांना तस तिथे जेवताना पाहून मला खुप वाइट वाटायच. सामाजिक न्याय वगैरेसारख्या गोष्ठी मनात थैमान घालायच्या .
अॅापरेशन झाल्यावर आठ दिवसांनंतर ते बाळही दगावल...मग आम्ही चार-आठ दिवस रडलो. बाळाच्या आईच सांत्वन केल.त्या मित्राला आधार दिला.....
उरली होती ती फक्त हळहळ.
मग अजुनही कधी कधी त्या हाऊसकिपींप करणार्रा लोकांबद्दल मनात विचार येतात.
हो.....आम्ही समाजातील शोषित घटकांवर फक्त चर्चा आणि विचारच करणार..तोही आजच्यापुरताच.
अजुन एक जळजळीत सत्य.....
समाजातील शोषित घटकांबद्दल आपल्या मनात पुसटशी का होइना तुच्छतेची भावना असतेच...हे सत्य कोणीच नाकारु शकत नाहीं.
त्यामुळे आमच्या सामाजिक जाणीवेला काही अर्थच उरत नाहीं.
पण एक आहे.
इथे प्रतेकजण स्वतःशीश busy आहे.दुसर्यांचा विचार करायला वेळ आहेच तरी कोणाकडे. कोणी कोणाशिवाय जगायच थांबत नसत..
येणारा प्रत्येक नवीन दिवस आपल्याला नवी दृष्टि देतो तसच बरच काही विसरायलाही शिकवतो.
सुख-दुख: चार दिवसांची आणि आठवणी आयुष्यभरासाठी असतात..
बस्स , त्याच आठवणी आपण बरोबर घेतो आणि चालतो . त्याच रोजच्या मळवाटेवरुन.
4-6 महिन्यांपुर्वी.माझ्या एका फ्रेंडचा भाचा म्हनजे दहा महिन्यांच बाळ आजारी होत.त्याच्या पोटात लिव्हरशेजारी कॅन्सरची गाठ होती.
केमो,रेडिएशन टेस्ट यातच साधारण आमचा एक-दीड महिना गेला होता.पुढे अॅापरेशनसाठी पुर्वतायारी आणि रिकव्हरीसाठी अजुन दोन आठवडे बाळाला हॅास्पिटलमध्येच ठेवाव लागणार होत.
अस साधारण तीन महिने कधी रोजच तर कधी दोन-तीन दिवसांआड आमच्या नियमितपणे हॅास्पिटलमध्ये चकरा होत असत.
तिथल्या पार्किंगशेजारी लागूनच एक टॅायलेट आहे.ते टॅायलेट मेंटेन करण्यासाठी हाऊसकिपींग करणारे आणि इतर बिलींगच वगैरे काम बघनारे एक असे दोन-तीन माणसं तिथं असतात.
बर्याचदा आम्ही त्यांना टॅायटेट-मुतारीच्या समोरच्याच एका कट्ट्यावर दुपारच जेवन करताना पाहिलेल..त्यांना तस तिथे जेवताना पाहून मला खुप वाइट वाटायच. सामाजिक न्याय वगैरेसारख्या गोष्ठी मनात थैमान घालायच्या .
अॅापरेशन झाल्यावर आठ दिवसांनंतर ते बाळही दगावल...मग आम्ही चार-आठ दिवस रडलो. बाळाच्या आईच सांत्वन केल.त्या मित्राला आधार दिला.....
उरली होती ती फक्त हळहळ.
मग अजुनही कधी कधी त्या हाऊसकिपींप करणार्रा लोकांबद्दल मनात विचार येतात.
हो.....आम्ही समाजातील शोषित घटकांवर फक्त चर्चा आणि विचारच करणार..तोही आजच्यापुरताच.
अजुन एक जळजळीत सत्य.....
समाजातील शोषित घटकांबद्दल आपल्या मनात पुसटशी का होइना तुच्छतेची भावना असतेच...हे सत्य कोणीच नाकारु शकत नाहीं.
त्यामुळे आमच्या सामाजिक जाणीवेला काही अर्थच उरत नाहीं.
पण एक आहे.
इथे प्रतेकजण स्वतःशीश busy आहे.दुसर्यांचा विचार करायला वेळ आहेच तरी कोणाकडे. कोणी कोणाशिवाय जगायच थांबत नसत..
येणारा प्रत्येक नवीन दिवस आपल्याला नवी दृष्टि देतो तसच बरच काही विसरायलाही शिकवतो.
सुख-दुख: चार दिवसांची आणि आठवणी आयुष्यभरासाठी असतात..
बस्स , त्याच आठवणी आपण बरोबर घेतो आणि चालतो . त्याच रोजच्या मळवाटेवरुन.