शुक्रवार, २४ जुलै, २०१५

लाखमोलाची माणसं

कौरव आणि पांडव आपापल्या परिने आजुबाजूच्या राज्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते...कर्णाच्या अग्रहामुळे दुर्योधनाला मदतीसाठी श्रीकृष्णाकडे द्वारकेला जाव लागल.

" ऐकीकडे नि:शस्त्र मी आणि आणि दुसरीकडे सशस्त्र अशी बलदंड सैनिकयोध्यांची 15 लाखांची यादवसेना यांपैकी काय पाहिजे तुला..?? " असा मोह टाकनारा विचित्र प्रश्न श्रीकृष्णानं दुर्योधनाला टाकला होता.

..........आणि दुर्योधनाने शेवटी 15 लाखांची यादवसेनाच स्विकारली..
त्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाकडे मदतीसाठी गेला. सहाजिकच अर्जुनाने एकट्या श्रीकृष्णाला स्विकारण भाग पडल..तिथे श्रीकृष्णानावर अर्जुनाच्या रथाचे सारख्य करायची जबाबदारी टाकली गेली.

दुर्योधनाच्या या निर्णयावर कर्णाने नाराजी व्यक्त केली.

 " त्यावर मी यादवांची 15 लाखांची सेना आपल्याकडे वळऊन कौरवांचे सामर्थ्य वाढवले आहे,तुला अस नाहीं का वाटत?"दुर्योधनाने कर्णाला उलटा सवाल केला.

" युवराजा , युद्धात बुद्धि नावाच शस्त्र सर्वात प्रभावी असत हे तुला माहित नाहीं का..?? अर्जुनाच्या रथाच सारथ्य करणारा श्रीकृष्ण आपल्या रथाचे वेग आखडेल पण जिभेचे वेग सैल सोडील हे तुला कस समझल नाहीं..?? "....कर्णाने दुर्योधनाला त्याच्या चुकीच्या निर्णयाबद्दल प्रश्न केले.

पुढे अफाट आणि बलाढ्या अशा कौरवांचा पांडवांकडून महायुद्धात पराभव झाला.

आपल्या आयुष्यातदेखिल अशी श्रीकृष्णासारखी माणसं येतात.ही माणसं आपल्या रिअल लाईफमध्ये महाभारतातील 15 लाख सैन्यापेक्षा श्रीकृष्णाप्रमाणेच महत्वाची भूमिका बजावत असतात.. आपल बरचस यश या माणसांवरच अवलंबून असत. या अशा काही माणसांसमोर आख्ख जग फिक असत.. खर तर अशा माणसांशिवाय आपल आयुष्यच अपुर्ण असत. या माणसांची जागा दुसर कोणी घेऊच शकत नाहीं ; पण कधी कधी मोहाच्या क्षणाला ही माणस आपल्यापासुन दुरावतात आणि मग सहाजिकच आपण अपयशाच्या खोल दरीत फेकले जातो.

आयुष्यातील ही माणसं कध्धीच दुखवायची किंवा गमवायची नसतात.ही माणसं जपायची आणि जतन करायची एक कला असते..ही कला ज्याला जमते तोच यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचतो आणि टिकतो.