शिवाजी महाराज आणि Social security.
मदारी मेहतर नावाचा जातीने भंगी,वर्गाने दलित आणि धर्माने मुस्लिम असलेला एक छोटा मुलगा शिवाजी महाराजांना चाकणच्या किल्ल्याच्या दरवाजापाशी सापडला.5-6 वर्षांच कोवळ अनाथ पोरगं.संभाजीराजांपेक्षा 4-2 वर्षांनी छोटा.आपल्या पोराच्याच वयाच्या कोवळ्या मुलाला काय बर काम सांगावे.
शेवटी राजेंनी मदारी मेहतरला पोटच्या लेकराप्रमाणेच कायम जवळ ठेवायचा निर्णय घेतला..इतक कि , आग्रा भेटीसाठी वयाने लहान असलेल्या शंभूराजे प्रमाणेच मदारीलाही बरोबर घेतल..मदारीनेही महाराजांच्या सुटकेसाठी शंभूराजेंनी केला तसाच प्रयत्न देखील केला.
महाराजांनी 6 जून 1674 ला रायगडावर राज्याभिषेक केला..अठरापगड जातीतले , वेगवेगळ्या धर्मातले,लहान-थोर,सरदार, सैनिक,शिपाई जे जे स्वराज्यासाठी झटले त्यांचा सगळ्यांचा मानसन्मान झाला..मात्र मदारी मेहतर हा एकमेव तरुण होता ज्याने राजेंकडून सत्कार स्विकारला नाही.
तेव्हा राजेंनी मदारीला हक्काने कायतरी मागायची आज्ञा केली.
तेव्हा मदारी मेहतर म्हणाला , " महाराज माझ्यासारख्या अनाथाला आपण पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलत यापोक्षा अजुन मला काय पाहिजे ..?? जर काही द्यायचच असेल तर मला तख्ताची सेवा करायची संधी ध्या,पण ती ही वंशपरंपरेने द्या.छत्रपतिंच जे प्रेम माझ्या वाट्याला आल तेच प्रेम छत्रपतिंच्या घरापासुन माझ्या पुढील पिढ्यांना मिळत राहाव..मी रोज आपल्या आसनावर स्वच्छ धुतलेली चादर टाकायच काम करित आलो तेच काम माझ्या वंशजांना परंपरेने द्याव.बस्स एवढच मला पाहिजे बाकी काही नको. "
आजही सातार्याच्या गादीची सेवा करायला याच मदारी मेहतरचे वंशज आहेत.
त्या काळी राजे एखाद्यासाठी पिढ्यानपिढ्या चालणारा G.R द्यायला साहसा तयार होत नसत.याला ठराविक अपवाद आहेत.
परंतु मदारीची निस्वार्थी सेवा म्हनूनच महाराजांनी त्याला वंशपरंपरेने पदवी दिली.
अनाथांना सनाथ करणारे,दलितांना घरात नव्हे चुलीपर्यंत नेणारे आणि अस्पृशांना जेव्हा गावात घेतल जात नव्हत अशा काळात मदारीला कायम आपल्यासोबत सावलीप्रमाणे ठेऊन राजेंनी एक मोठ्ठ सोशल इंजीनियरिंग केल.
आता तर महाराजांच्या social securityची Hight बघा.
आपल्या या निष्ठावंत सेवकाची महाराजांनी रायगडावर समाधि बांधली.
समाधि संतांची असते,महापुरुषांची असते,राजाची असते,सरदाराची असते किंवा एखाद्या नेत्याची असते ; पण जगाच्या इतिहासात हे अस पहिल्यांदा घडले कि इथे स्वराज्यात चक्क एका सेवकाची समाधि बांधली गेली.ती सुद्धा स्वतः शिवाजी महाराजांनी बांधली.
माणसाला एका ठराविक पातळीपर्यंत पद , career पैसा , पत , प्रतिष्ठा हवी असते ; पण तिथुन पुढे काय ..??
मित्रांनो जरा विचार करा..आजच्या जगात असा कोणता असा उद्योगसमुह आहे का , कोणती अशी कंपनी आहे का जी आपल्या हाताखालच्या लोकांना अशी इतकी पिढ्यान पिढ्या टिकणारी social security देऊ शकते..??
शिवाजी महाराज आपल्याला माणसांमध्ये investment करायला शिकवतात .
आपल्याकडे सत्ता , संपत्ती , अधिकार काही असो किंवा नसोत माणसं आपल्याला पिढ्यान पिढ्या टिकतात..
शिवचरित्रातून शिकण्यासारख्या खुप सार्या गोष्ठी आहेत.वेळ मिळेत तसा अजुन लिहत राहिल.
मदारी मेहतर नावाचा जातीने भंगी,वर्गाने दलित आणि धर्माने मुस्लिम असलेला एक छोटा मुलगा शिवाजी महाराजांना चाकणच्या किल्ल्याच्या दरवाजापाशी सापडला.5-6 वर्षांच कोवळ अनाथ पोरगं.संभाजीराजांपेक्षा 4-2 वर्षांनी छोटा.आपल्या पोराच्याच वयाच्या कोवळ्या मुलाला काय बर काम सांगावे.
शेवटी राजेंनी मदारी मेहतरला पोटच्या लेकराप्रमाणेच कायम जवळ ठेवायचा निर्णय घेतला..इतक कि , आग्रा भेटीसाठी वयाने लहान असलेल्या शंभूराजे प्रमाणेच मदारीलाही बरोबर घेतल..मदारीनेही महाराजांच्या सुटकेसाठी शंभूराजेंनी केला तसाच प्रयत्न देखील केला.
महाराजांनी 6 जून 1674 ला रायगडावर राज्याभिषेक केला..अठरापगड जातीतले , वेगवेगळ्या धर्मातले,लहान-थोर,सरदार, सैनिक,शिपाई जे जे स्वराज्यासाठी झटले त्यांचा सगळ्यांचा मानसन्मान झाला..मात्र मदारी मेहतर हा एकमेव तरुण होता ज्याने राजेंकडून सत्कार स्विकारला नाही.
तेव्हा राजेंनी मदारीला हक्काने कायतरी मागायची आज्ञा केली.
तेव्हा मदारी मेहतर म्हणाला , " महाराज माझ्यासारख्या अनाथाला आपण पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलत यापोक्षा अजुन मला काय पाहिजे ..?? जर काही द्यायचच असेल तर मला तख्ताची सेवा करायची संधी ध्या,पण ती ही वंशपरंपरेने द्या.छत्रपतिंच जे प्रेम माझ्या वाट्याला आल तेच प्रेम छत्रपतिंच्या घरापासुन माझ्या पुढील पिढ्यांना मिळत राहाव..मी रोज आपल्या आसनावर स्वच्छ धुतलेली चादर टाकायच काम करित आलो तेच काम माझ्या वंशजांना परंपरेने द्याव.बस्स एवढच मला पाहिजे बाकी काही नको. "
आजही सातार्याच्या गादीची सेवा करायला याच मदारी मेहतरचे वंशज आहेत.
त्या काळी राजे एखाद्यासाठी पिढ्यानपिढ्या चालणारा G.R द्यायला साहसा तयार होत नसत.याला ठराविक अपवाद आहेत.
परंतु मदारीची निस्वार्थी सेवा म्हनूनच महाराजांनी त्याला वंशपरंपरेने पदवी दिली.
अनाथांना सनाथ करणारे,दलितांना घरात नव्हे चुलीपर्यंत नेणारे आणि अस्पृशांना जेव्हा गावात घेतल जात नव्हत अशा काळात मदारीला कायम आपल्यासोबत सावलीप्रमाणे ठेऊन राजेंनी एक मोठ्ठ सोशल इंजीनियरिंग केल.
आता तर महाराजांच्या social securityची Hight बघा.
आपल्या या निष्ठावंत सेवकाची महाराजांनी रायगडावर समाधि बांधली.
समाधि संतांची असते,महापुरुषांची असते,राजाची असते,सरदाराची असते किंवा एखाद्या नेत्याची असते ; पण जगाच्या इतिहासात हे अस पहिल्यांदा घडले कि इथे स्वराज्यात चक्क एका सेवकाची समाधि बांधली गेली.ती सुद्धा स्वतः शिवाजी महाराजांनी बांधली.
माणसाला एका ठराविक पातळीपर्यंत पद , career पैसा , पत , प्रतिष्ठा हवी असते ; पण तिथुन पुढे काय ..??
मित्रांनो जरा विचार करा..आजच्या जगात असा कोणता असा उद्योगसमुह आहे का , कोणती अशी कंपनी आहे का जी आपल्या हाताखालच्या लोकांना अशी इतकी पिढ्यान पिढ्या टिकणारी social security देऊ शकते..??
शिवाजी महाराज आपल्याला माणसांमध्ये investment करायला शिकवतात .
आपल्याकडे सत्ता , संपत्ती , अधिकार काही असो किंवा नसोत माणसं आपल्याला पिढ्यान पिढ्या टिकतात..
शिवचरित्रातून शिकण्यासारख्या खुप सार्या गोष्ठी आहेत.वेळ मिळेत तसा अजुन लिहत राहिल.