बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

तडजोड करणारे शिवाजी महाराज

भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता.
झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता.
ताठ कणा हाच मराठी बाणा.
 .
अरे , पण कोण शिकवत हे सगळ..??
As per my information कुठला आभ्यासू माणूस हा असला उद्धटपणा कधीच कोणाला शिकवणार नाही.
 .
काही तरी गफलत होते आहे.
थोड क्रॅास लिहतोय.बघा पटतय का..
 .
म्हनजे शिवाजी राजांनी आयुष्यात कधीच कुठेच adjustment , compromise केल नाहीं का..??
आपण महापुरुषांना नको तितका मोठेपणा द्यायच्या नादात तद्दन तकलादू आणि खोटा स्वाभिमान जागृत करणार्या गोष्ठी समाजात पेरत आहोत. कध्धीच कोणासमोर न झुकणे compromise , adjustment आणि Co-operate न करणे या चुकीच्या अतिस्वाभिमानामुळे काहीच फायदा होत नसतो.
 .
प्रत्येक यशस्वी माणूस हा अपयशाच्या शेकडो पायर्या चढूनच यशस्वी झालेला असतो.सगळे दिवस सारखे नसतात.
Time is Powerfull.
कोणावर कधी आणि कशी वाइट वेळ येइल हे सांगता येत नाहीं.
आपल आयुष्य काय नि् महापुरुषांच आयुष्य काय , compromise , adjustment आणि co operate केल्याशिवाय आयुष्य जगन अशक्यच.प्रत्येक जन जीवनात कुठेतरी खाजील,अपमानित झालेलाच असतो.काही जन Share करतात तर काही जन या गोष्ठी सिक्रेट ठेवतात.
 .
शिवाजी महाराजांनी देखिल आयुष्यात खुप तडजोडी केल्या आहेत.
अफजलखान प्रकरण , पुरंदरचा तह आठउन पहा.पुरंदरचा तह झाला नसता तर कदाचित स्वराज्य तेव्हाच बुडाल असत.मुघल सरदार दिलेरखान आणि मिर्झा राजे जयसिंह यांच्या नासधुसीपासुन रयतेला होणारा त्रास टाळण्यासाठी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला..( as a compramise )
तहानुसार रक्ताच पाणी करुन कमवलेले २३ किल्ले आणि कित्येक लाख रुपये उत्पंन्न असलेला प्रदेश मुघलांना द्यावा लागला.
 .
तहामधील कलमानुसार महाराजांना नाइलाजात्सव बादशहाच्या भेटीसाठी आग्र्याला जाव लागल.तिथे कैद भोगावी लागली..तिथे महाराजांनी मुघल मॅनेजमेंटबरोबर गोड गोड बोलून बरोबर गेलेल्या दोन-तीन हजार मावळ्यांना मुघलांच्या राज्यातून बाहेर पडण्यासाठीचे परवाने बादशहाकडून मिळवले .
जवळचे पैसे संपत आलेले त्यामुळे तेथील सावकार , व्यापार्यांकडून कर्ज पण घ्याव लागल.
 .
तिथून शिफातीने सुटून आल्यावर मुघलांच आक्रमण टाळण्यासाठी समझोता करुन ९-१० वर्षाच्या कोवळ्या पोराला शंभूराजाला मुघलांचा पंचहजारी मनसबदार म्हनुन औरंगाबादला शहजादा मुअज्जमकडे पाठवाव लागल.कारण त्यावेळेस शिवाजी महाराजांकडे compromise करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.५ लाखांची फौज घेउन जर औरंगजेबाने स्वराज्यावर आक्रमण केल असत तर ते त्यावेळेस परवडल असत का..??
औरंगजेब तर दख्खनवर स्वारी करण्यासाठी उतावळा झाला होता .
 .
नंतरची दोन-तीन वर्षे महाराजांनी काही अॅक्टीविटी केल्याच दिसत नाहीं . ते सलग दोन-तीन वर्षे स्वराज्याची व्यवस्थित घडी बसवण्यातच व्यस्त होते .
पुढे औरंगजेबाबरोबर एकत्रपणे लढता येइल याच दृष्टिकोणातूनामुळे राजांनी शेजारील राज्य गोवळकोंड्याच्या ( हैद्राबाद ) कुतुबशहाबरोबर भेट घेउन चांगले संबंध बनवले.ज्यावेळेस राजे कुतुबशहाला भेटीसाठी गेले होते .
 .
पुढील काळात महाराजांनंतर संभाजीराजेंनीसुद्धा हाच कित्ता गिरवलेला दिसतोय.
ऐकेकाळी स्वराज्याच्या जिवावर उठलेल्या आदिलशाहीवर औरंगजेब चालुन आला त्यावेळेस आदिलशाही वाचविन्यासाठी संभाजी राजांनी विजापुरला फौजा पाठवल्या होत्या.कारण दख्खनेवर झालेल्या बलाढ्य औरंगजेबाच्या आक्रमनाला तोंड देण्यासाठी दक्षिण भारतातील कुतुबशाही,आदिलशाही आणि मराठा स्वराज्य यांनी एकत्र येण ही काळाची गरज होती.
 .
जे काही घडल ते इतिहासात घडून गेल ,
आता आपण आपल्या आजच्याबद्दल बोलू...
नोकरी,धंदा आणि कॅार्पोरेट सेक्टरमध्ये काम करत असताना खुप adjustment , compromise आणि Co operate करावच लागत.याशिवाय नोकरीही टिकत नाही आणि धंदा तर नाहींच नाही.
तुम्ही जर बिजनेस करत असाल तर उधारी वसुल करताना पाठीचे कणे ताठ ठेउन बघा काय होतय ते.
जॅाबमध्येही यापेक्षा वेगळ काही नसत.अॅप्रायझल , पोस्टींग ,इन्क्रीमेंट,पगारवाढीसाठी पाठीचे कणे ताठ ठेउन सामोरे जा बर , बघा काय होतय ते.
 .
प्रत्येक वेळेस पाठीचे कणे ताठ ठेउन काम होत नसतात.त्यामुळे मी माझी काम करुन घेण्यासाठी मी सर्वप्रथम compromise , adjustment आणि co-operate हे प्राथमिक मार्ग वापरतो.आणि जर मला वाटल कि सिधी उंगलीसे घी नहीं निकलनेवाला है तेव्हा माझ्याकडे इतर पर्याय खुले असतातच.
 .
 ।। जय शिवराय ।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा